Team Agrowon
लाल मिरचीच्या भावात दिवसेंदिवस काहीशी वाढ होताना दिसत आहे.
सध्या बाजारातील आवक कमीच आहे. तर दुसरीकडे उठाव चांगला आहे.
दुष्काळामुळे यंदा मिरची उत्पादनात ५ ते १५ टक्क्यांनी कमी राहण्याची शक्यता आहे.
ही परिस्थितीत लक्षात घेऊन स्टाॅकिस्ट आणि निर्यातदारही खरेदीत उतरले आहेत.
त्यामुळे मिरचीच्या भावात २० टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली. सध्या मिरचीला व्हरायटी आणि गुणवत्तेप्रमाणे १५ हजार ते २५ हजारांचा भाव मिळत आहे.
मिरचीच्या भावातील ही तेजी टिकून राहील, असा अंदाज मिरची बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.