Swarali Pawar
सध्या वाढलेल्या तापमानामागे सुपर एल निनो हे मोठं कारण आहे. यामुळे उष्णतेच्या लाटा तयार होऊन शेती, जनावरं आणि माणसांवर परिणाम होतो.
काही दिवस सतत नेहमीपेक्षा जास्त तापमान राहिलं तर ती उष्णतेची लाट असते. ही परिस्थिती पिकं, पाणी आणि आरोग्यावर परिणाम करते.
पॅसिफिक महासागरातील पाणी जास्त गरम झालं की एल निनो निर्माण होतो. यामुळे भारतात पाऊस कमी आणि तापमान जास्त होतं.
भारतामध्ये भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे. म्हणून तापमानानुसार उष्णतेची लाट ठरवली जाते.
मैदानी भागात ४०°C पेक्षा जास्त तापमान असेल तर लाट मानली जाते. तापमान ६.५°C ने वाढल्यास ती तीव्र उष्णतेची लाट ठरते.
तापमान ४५°C पेक्षा जास्त असेल तर उष्णतेची लाट असते. ४७°C पेक्षा जास्त गेल्यास ती तीव्र उष्णतेची लाट म्हणतात.
उष्णतेमुळे पिकांची वाढ कमी होते आणि उत्पादन घटते. म्हणून पिकांना गरजेनुसार पाणी आणि आच्छादन द्यावे.
गोठा, पाणी आणि आहार व्यवस्थापन योग्य ठेवा. उष्णतेपासून बचावासाठी वेळेवर उपाय करणं खूप गरजेचं आहे.