Anuradha Vipat
गोड खाणे सोडल्यास शरीरात अवघ्या काही दिवसांतच सकारात्मक आणि आश्चर्यकारक बदल दिसायला लागतात.
शरीरातील रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढणे आणि कमी होणे थांबते.
गोड खाल्ल्यानंतर सुरुवातीला खूप एनर्जी वाटते आणि नंतर अचानक थकवा येतो. साखर सोडल्यामुळे दिवसभर शरीरात समान ऊर्जा टिकून राहते.
शरीरातील अतिरिक्त पाणी कमी झाल्यामुळे वजनाचा काटा लगेच खाली येतो.
साखर शरीरात 'इन्फ्लेमेशन' निर्माण करते, ज्यामुळे पिंपल्स आणि अकाली वृद्धत्व येते. साखर सोडताच त्वचा चमकदार आणि तरुण दिसू लागते.
पहिल्या ३-४ दिवसांत गोड खाण्याची तीव्र इच्छा होते, पण आठवडा संपेपर्यंत ही इच्छा खूप कमी होते.
लिव्हरमध्ये जमा होणारी अतिरिक्त चरबी कमी होते. विशेषतः पोटावरची जिद्दी चरबी झपाट्याने कमी होण्यास सुरुवात होते.