Swarali Pawar
उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे जनावरांनाही उष्णतेचा त्रास होतो. योग्य काळजी घेतली नाही तर जनावरांमध्ये उष्माघात होऊ शकतो.
उष्माघात म्हणजे जनावरांच्या शरीराचे तापमान जास्त वाढणे. यामुळे जनावरांची ताकद कमी होते आणि आरोग्यावर परिणाम होतो.
जेव्हा शरीरातील उष्णता बाहेर पडत नाही तेव्हा उष्माघात होतो. जास्त तापमानामुळे जनावरांवर ताण येऊ लागतो.
उन्हाळ्यात भर उन्हात जनावरांकडून जास्त काम करून घेतल्यास ताण वाढतो. यामुळे जनावरांमध्ये उष्माघाताची शक्यता वाढते.
जनावरांना वेळेवर पाणी मिळाले नाही तर शरीराचे तापमान वाढते. पुरेसे पाणी न पिल्यास उष्माघात होण्याची शक्यता असते.
जनावरांना खुराक न देता काम करून घेतल्यास त्यांची सहनशक्ती कमी होते. अशा परिस्थितीत उष्णतेचा परिणाम अधिक होतो.
गोठ्यात कोंदट वातावरण असल्यास जनावरांना त्रास होतो. हवा खेळती नसल्यास उष्णतेचा ताण वाढू शकतो.
गाई-म्हशींना भर उन्हात चरायला नेल्यास उष्णतेचा परिणाम वाढतो. उन्हातून आलेल्या जनावरांवर लगेच थंड पाणी ओतणेही टाळावे.