Team Agrowon
कापसाचे वाढीव उत्पादन मिळविण्यासाठी बरेचसे शेतकरी दरवर्षी कपाशीची फरदड घेतात. पण फरदड घेण्याचे फायद्यांपेक्षा जास्त नुकसानच जास्त आहे.
कापसाच्या वेचण्या झाल्यानंतर एखाद पाणी देऊन पुन्हा कापूस पीक घेण्याच्या पद्धतीला फरदड कापूस म्हणतात.
फरदड पिकांमध्ये चांगल्या उत्पादनासाठी पाणी, खते, कीटकनाशकांचा वापर केला जातो. या पद्धतीमुळे कापूस पीक शेतामध्ये मार्च महिन्यानंतर राहते.
या पध्दतीमुळे शेतात जास्त काळ कापूस पीक राहिल्याने गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होतं.
कपाशी वेचणीनंतर रब्बी नंतरच्या हंगामामध्ये नवीन पीक घेण्यासाठी जमिनीची मशागत करावी लागते. त्यामुळे मशागत, पेरणी आणि बियाणे अशा गोष्टींवरील खर्च वाढतो.
गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम लक्षात घेतला तर तिचं चांगल नियंत्रण करण्यासाठी वेळेवर हंगाम संपविणं गरजेचं आहे. म्हणून कोणत्याही परीस्थितीत शेतकऱ्यांनी फरदड घेऊ नये.
कपाशीची फरदड न घेता वेळेवर कपाशीची वेचनी करुन डिसेंबर नंतर शेतामध्ये कपाशीचे पिक ठेवू नये. हंगाम संपल्यानंतर शेतामध्ये जनावरे किंवा शेळया, मेंढया चरण्यासाठी सोडाव्यात.