Mahesh Gaikwad
गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यातील सामान्य तापामानाचा पारा बहुतांश भागात ४० अंशाच्या पार गेल्याचे पाहायला मिळत आहे.
यंदा दिल्लीसारख्या शहरांमध्ये आणि अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ५० अंशाच्या पार गेल्याचेही पाहायला मिळाले.
तर देशातील अधिकांश भागातही उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळतो आहे.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा मात्र उष्णतेच्या झळा जास्त असल्याचे चित्र आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात उष्णता वाढत आहे, याची कारणे काय आहेत? हेच आपण पाहणार आहोत.
पेट्रोल, डिझेलचा वाढता वापर आणि औद्योगीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
याशिवाय विकासाच्या नावाखाली बेदरकारपणे झाडांची कत्तल केली जात आहे.
अशा अनेक कारणांमुळे पृथ्वीवर हरित वायु जमा होत आहेत.
कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनचे अधिक प्रमाणामुळे पृथ्वीच्या वायुमंडळात उष्णता अडकते.