Team Agrowon
हरभरा पिकाला तुषार सिंचन पद्धतीन पाणी दिल्यास आणि सुधारित वाणांची लागवड केल्यास उत्पादनात चांगली वाढ होते. गरजेपेक्षा जास्त पाणी दिल्यास पीक उभळत म्हणजेच पिकाची शाखीय वाढ जास्त होते आणि घाटे कमी लागतात.
हरभरा पिकाला साधारणपणे २५ सेंटीमीटर पाण्याची गरज असते. ही पाण्याची गरज साध्य होते ती तुषार सिंचनाने.
जमिन भुसभुशीत राहते. स्प्रिंकलरने पिकाला पाहिजे तेवढे आवश्यक त्या वेळेला पाणी देता येतं.
पिकातील तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
मूळकूज रोग नियंत्रणात राहतो. मूळकूज हा हरभऱ्यातील प्रमुख रोग आहे. या रोगामुळे हगरभऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान होतं.
तुषार सिंचन पद्धतीमध्ये जमिनीत नेहमीच वाफसा स्थिती राहत असल्यामुळे पिकाला दिलेली सर्व खते पूर्णपणे उपलब्ध होतात आणि वाफसा स्थितीमुळे पिकाची अन्नद्रव्य शोषणाची क्षमताही वाढते.
पिकाची अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते. नेहमीच्या पाणी देण्याच्या पद्धतीत जास्त पाण्यामुळे पिकाला दिलेली खते, अन्नद्रव्य वाहून किंवा खोलवर जाण्याची शक्यता असते.