Team Agrowon
लागवड खर्चात बचत करून जमीनीची सुपीकता वाढविण्यासाठी शून्य मशागत तंत्रज्ञान उपयुक्त आहे.
मातीच्या सुपीक थरांमध्ये फारशी उलथापालथ होत नाही. सेंद्रिय पदार्थांची मातीमध्ये दीर्घकालीन साठवण होण्यास मदत होते.
सातत्याने सेंद्रिय कर्बाची उपलब्धता आणि ओलावा टिकून राहिल्याने मातीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत वाढ होते.
पूर्वीच्या पिकाची मुळे जमिनीत राहिल्यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जलद गतीने वाढते. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे रासायनिक खताची बचत होते.
विपुल प्रमाणात जमिनीमध्ये गांडूळांचा संचार सुरु होतो. जमिनीत जैविक विविधतेत वाढ होऊन मातीचे आरोग्य सक्षम होते.
मातीचे तापमान नियंत्रित राहते. मातीच्या कणांची रचना सुधारते. मशागतीसाठी लागणारे मनुष्यबळ यात बचत होते.
जमिनी भेगाळण्याचे प्रमाण कमी होते तसेच जमिनीची धूप कमी होते. मातीमध्ये सच्छिद्रता निर्माण होऊन पिकाच्या मुळाशी वायू आणि पाणी यांचे प्रमाण योग्य राहते.
बाष्पीभवन कमी होऊन ओलावा टिकून राहिल्याने उपलब्ध पाण्याचा योग्य वापर होतो. पावसाचे पाणी भूगर्भात झिरपण्याचे प्रमाण वाढते.