Anuradha Vipat
कलिंगड आणि आंबा ही उन्हाळ्यातील अत्यंत लोकप्रिय फळे आहेत.
मात्र कलिंगड आणि आंबा खाताना केलेल्या काही लहान चुका आरोग्यासाठी पचनक्रियेसाठी गंभीर ठरू शकतात.
कलिंगडात ९२% पाणी असते. ते खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायल्यास पाचक रस पातळ होतात. यामुळे अपचन होते.
कलिंगड निसर्गातील थंड आणि आम्लयुक्त असते. रात्री खाल्ल्याने कफ, खोकला आणि वजन वाढू शकते.
कलिंगड खाल्ल्यावर लगेच दूध प्यायल्यास शरीरात विषारी घटक तयार होतात.
आंबा उष्ण असतो. तो खाण्यापूर्वी किमान ३० मिनिटे पाण्यात न भिजवल्यास अंगावर पुरळ आणि उष्णतेचे फोड येतात.
जेवणानंतर आंबा खाल्ल्याने शरीरातील कॅलरीज अचानक वाढतात. यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढते.