Water Crisis : जालन्यातील 'या' गावात पाण्याची टंचाई

Team Agrowon

भर हिवाळ्यात शहरासह तालुक्यातील अनेक भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

Water Issue | Agrowon

पर्यायी व्यवस्था म्हणून प्रशासनाकडून विहिरी अधिग्रहण करून टंचाईग्रस्त गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Water Issue | Agrowon

त्यातच आजघडीला हिवाळ्यातच ही स्थिती आहे तर उन्हाळ्यात काय होणार, याची चिंता सर्वांना लागली आहे.

Water Issue | Agrowon

यंदा जेमतेम पाऊस झाल्याने जवळपास सर्वच भागातील नदी, नाल्या, विहिरी, लहान, मोठे, जलसाठे, गाव तलाव कोरडेठाक पडले आहेत.

Water Issue | Agrowon

शहराला पाणीपुरवठा करणारे भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठे दानापूर येथील जुई मध्यम प्रकल्पही पूर्णपणे रिकामा झाला आहे.

Water Issue | Agrowon

परिणामी भोकरदन शहरात मागील दोन ते अडीच महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले आहे. तालुक्यातील २५ ते ३० गावातील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. 

Water Issue | Agrowon

NEXT- खानदेशात काय पपईला काय मिळतोय दर?

क्लिक करा..