sandeep Shirguppe
वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत दरम्यान या सणात तिळाला आणि गुळाला चांगला दर मिळत आहे.
सध्या बाजारात गावरान तिळाची मागणी वाढली आहे. यामुळे तीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे.
संक्रांतीनिमित्त तीळ आणि गुळासोबत हलवाही दिला जातो. सध्या बाजारात येणाऱ्या तीळगुळाच्या किंमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मराठवाड्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात तिळाचे उत्पादन होते. या गावरान तिळाला २४० ते २५० रुपये भाव मिळत होता.
मकर संक्रांतनिमित्त तिळाची आवक वाढल्याने किंमतीत ही कमालीची वाढ झाली आहे.
राजस्थानच्या ब्यावर, जयपूर, भिलवडा भागातून रेवड्या आल्या आहेत. या रेवड्या ३६० ते ४०० रुपये किलोने विक्री होत आहेत.
तर तिळाची चिक्की १०० रुपयांत ४०० ग्रॅम आहे. रोज व इतर फ्लेवरच्या रेवडीचा भाव २८० ते ३०० रुपये किलोने जात आहे.
कमी पावसाने तिळाचे उत्पादन कमी झाल्याने ग्रामीण भागातील तिळाला मोठी मागणी वाढल्याने दर वाढला आहे.
शेतकऱ्यांनी पिकवलेल्या तिळाला चांगला भाव मिळत असल्याने काही भागातील शेतकऱ्यांची संक्रांत गोड होत आहे.