Team Agrowon
औषधी गुणधर्माच्या वाळ्याला उन्हाळ्यात विशेष महत्व आहे.
वाळ्याच्या मुळांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात.
माठ किंवा पिंपातील पाण्यात वाळा टाकला जातो. ते सुगंधी पाणी प्यायल्यास तहान भागते आणि थंडावा मिळतो.
वाळा थंड गुणात्मक असल्यामुळे पित्तशामक विशेषतः ‘आग’ कमी करतो.
उन्हाळ्यात खूप घाम येणे सामान्य आहे. मात्र काहींना पित्तामुळे जास्त प्रमाणात येतो. अशावेळी वाळा पावडर उटण्याप्रमाणे अंगास लावावी.
त्वचेवर काही कारणांनी लालसरपणा येतो. कीटक चावल्यामुळे आग होते. त्यावेळी चंदन आणि वाळा यांचा लेप लावावा. आग कमी होण्यास मदत होते.
उन्हाळ्यात किंवा मुत्रमार्गात जंतूसंसर्ग झाल्यामुळे लघवी कमी प्रमाणात होऊन आग होते. अशावेळी वाळा पावडर खडीसाखर, तांदळाच्या धुवणासह वापरावी.