Swarali Pawar
बाजरी कमी कालावधीत तयार होते आणि ५–६ पाण्याच्या पाळ्या पुरेशा होतात. कीड-रोग कमी येतात आणि जनावरांसाठी चांगला चारा मिळतो.
मध्यम ते भारी व निचरा होणारी जमीन बाजरीसाठी योग्य असते. नांगरणी करून कुळवाच्या पाळ्या द्याव्यात व शेणखत मिसळावे.
१५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी हा पेरणीसाठी उत्तम काळ आहे. उशीर केल्यास उष्णतेचा परिणाम होऊन उत्पादन कमी होते.
३–४ किलो बियाणे प्रति हेक्टर पुरेसे असते. ४५ × १५ सें.मी. अंतरावर व ३–४ सें.मी. खोलीवर पेरणी करावी.
संकरीत वाण: आदिशक्ती, फुले महाशक्ती, JHB-558. सुधारित वाण: धनशक्ती, ICMV-221 आणि खाजगी वाण वापरता येतात.
मीठाच्या द्रावणाने बीजप्रक्रिया करून खराब बियाणे वेगळे काढावे. मेटॅलॅक्झील व जिवाणू खताची प्रक्रिया केल्यास रोग कमी येतात.
अझोटोबॅक्टर व PSB २५ ग्रॅम प्रति किलो वापरल्यास नत्राची बचत होते. यामुळे उत्पादन सुमारे १० टक्क्यांनी वाढते.
माती परीक्षणानुसार नत्र, स्फुरद व पालाश द्यावे. झिंक कमी असल्यास झिंक सल्फेट वापरून उत्पादन वाढवावे.