Team Agrowon
सध्या भारतात आंब्याचा हंगाम सुरू आहे. विशिष्ट चव आणि सुगंधासाठी प्रसिध्द असणााऱ्या भारताच्या आंब्याला जगभरातून मोठी मागणी असते.
जगाच्या तुलनेत भारतात सर्वाधिक आंबा उत्पादित होतो. पण तुम्हाला माहित आहे का, भारतीय आंब्याला जगातील कोणत्या देशाकडून सर्वात जास्त मागणी असते.
संयुक्त अरब अमिराती (युएई) हा देश भारतातून सर्वाधिक आंबा आयात करतो. भारतीय आंब्याच्या खरेदीत याचा पहिला क्रमांक लागतो.
डीजीसीआईएस अनुसार, युएई हा देश इतर देशांच्या तुलनेत ४४.२ टक्के आंब्याची आयात भारतातून करतो.
युएईपाठोपाठ आंबा खरेदीत दुसऱ्या क्रमांकावर युके हा देश आहे. भारतात उत्पादित होणाऱ्या एकूण आंब्याच्या २२.४१ टक्के आंबा युके खरेदी करतो.
भारतातील जवळपास ९० टक्के आंबा प्रमुख आठ देश खरेदी करतात. यामध्ये युएई, युके, कतार, ओमान, कुवेत, नेपाळ, सिंगापूर आणि कॅनडा या राज्यांचा समावेश आहे.
भारतातील लंगडा, मराठवाडा केशर, दशहरी, चौसा या आंब्याच्या जातींना परदेशी बाजारपेठेत मोठी मागणी आहे.