Team Agrowon
काढणीनंतर फळे व भाजीपाल्याची योग्य हाताळणी पॅकिंग,साठवण आणि वाहतूक व्यवस्थेच्या अभावामुळे दरवर्षी देशात ३० ते ४० टक्के नासाडी होते.
नासाडी टाळण्यासाठी फळे आणि भाज्या काढल्यानंतर त्यांची योग्य ती प्रतवारी करून पॅकिंग करणे अत्यंत आवश्यक आहे.
कोणत्या बाजारपेठेत भाज्या पाठवायच्या यावरून त्याचे पॅकिंग वेगवेगळे असते. शेतीमाल किंवा खाद्यपदार्थांच्या योग्य पॅकेजिंगमुळे त्यांचे संरक्षण होते. ब्रँड तयार होतो.
खाद्यपदार्थ आकर्षकपणे सादर करता येतात. पॅकेजिंग क्षेत्र हे अन्न उद्योगाचा सर्वात जलद विकसित होणारा भाग आहे.
पॅकेजिंग वातावरणातील प्रदूषण कमी करण्यास मदत करते.
पॅकेजिंग अन्नातील नासाडी कमी करते. पॅकेजिंगवर होणारी अतिरिक्त गुंतवणूक कमी करते.
सध्या खाद्य पॅकेजिंग, स्मार्ट पॅकेजिंग, अँटी-मायक्रोबियल पॅकेजिंग, पाण्यात विरघळणारे पॅकेजिंग,सेल्फ-कुलिंग असे प्रकार आहेत.
सेल्फ हिटींग पॅकेजिंग/ उष्णता समायोजन पॅकेजिंग, चव आणि गंध शोषक पॅकेजिंग आणि सूक्ष्म पॅकेजिंग असेही काही पॅकेजिंगचे प्रकार उपलब्ध आहेत.