sandeep Shirguppe
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमध्ये माता मृत्यूचा दरात घट होत आहे.
२०२१-२२ मध्ये माता मृत्यूचे प्रमाण ५७ टक्के होते. मार्च २०२४ मध्ये हे प्रमाण २४ टक्क्यांवर आले आहे.
नऊ आदिवासी तालुक्यात गेल्या तीन वर्षांत ८९ हजार ३९२ गर्भवतींची प्रसूती झाली, यात विविध कारणांनी ३६ मातांचा मृत्यू झाला.
माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश मिळाले, परंतु माता मृत्यू शून्यावर आणण्याचे ध्येय आरोग्य विभागाने निश्चित केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या गाभा समितीच्या बैठकीतून ही माहिती समोर आली आहे.
साधारण आदिवासी तालुक्यांमध्ये पंधरा वीस वर्षांपूर्वीचा काळ पाहिल्यास प्रसूतीदरम्यान महिलांचे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक होते.
सरकारच्या जननी सुरक्षा योजनेमुळे प्रसूतीसाठी महिला रुग्णालयात येत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती होऊन वेळात उपचार मिळत आहे.
याशिवाय विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळत आहे. परिणामी माता मृत्यूच्या प्रमाणातही घट झाली आहे.
मातेचे आरोग्य सुधारावे तसेच गर्भवती, स्तनदा मातांना सकस आहार मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.