Anuradha Vipat
शरीर हायड्रेट ठेवणे म्हणजे केवळ भरपूर पाणी पिणे नव्हे, तर शरीरातील पाण्याचे आणि इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण संतुलित राखणे होय.
शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असल्यास पचनक्रिया सुधारते, त्वचा चमकदार होते आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते.
नारळ पाणी हे आरोग्यासाठी सर्वोत्तम नैसर्गिक 'इलेक्ट्रोलाइट' आहे. यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते.
काकडीमध्ये तब्बल ९५% पेक्षा जास्त पाणी असते. उन्हाळ्यात किंवा रोजच्या आहारात सॅलड म्हणून काकडी खाल्ल्याने शरीर दीर्घकाळ हायड्रेट राहते .
या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. तसेच यातील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C मुळे त्वचेला थंडावा मिळतो.
जेवणानंतर एक ग्लास ताक पिणे शरीराला हायड्रेट ठेवण्याचा सोपा पारंपरिक उपाय आहे. ताकातील प्रोबायोटिक्स पचनक्रिया देखील मजबूत करतात.
हलका थकवा किंवा चक्कर आल्यासारखे वाटल्यास पाण्यात लिंबू, थोडे मीठ आणि साखर घालून पिण्याने शरीरातील सोडियमची पातळी त्वरित संतुलित होते.