Mahesh Gaikwad
भारतातल्या प्रत्येक घरात चहा हे नित्य नियमाने पिला जातो. काही लोक तर चहाचे अक्षरश: शौकीनच असतात.
चहाचे शौकिन असणारे दिवसभरात कितीही चहा पितात. पण हे अति चहा पिणे अशा लोकांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
त्यामुळे सामान्य व्यक्तीने एका दिवसात किती चहा प्यायला पाहिजे आणि जास्त चहा प्यायल्याने त्याचा काय परिणाम होतो, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आहार तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एका दिवसात २-३ कपपेक्षा अधिक चहा किंवा कॉफी पिऊ नये.
जास्त प्रमाणात चहा प्यायल्यामुळे शरीरामध्ये डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते.
२-३ कपांपेक्षा जास्त चहा प्यायल्यामुळे पोटामध्ये गॅस, जळजळ आणि अपचनाच्या समस्या होवू शकते.
तुम्ही दिवसभरात जेवढे कप चहा प्याल त्याशिवाय किमान तेवढे ग्लास पाणी तुम्ही प्यायलेच पाहिजे.
जर तुम्ही दिवसभरात २ कप चहा पित असाल, तर दोन ग्लास अधिकचे पाणी तुम्ही प्यायलेच पाहिजे. ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे.