Anuradha Vipat
आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला वेळ कमी पडतो. काही स्मार्ट सवयी अंगीकारल्यास दिवस अधिक नियोजनबद्ध, तणावमुक्त बनू शकतो.
रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी दिवसातील महत्त्वाची कामे लिहून ठेवा. यामुळे कोणते काम आधी करायचे हे स्पष्ट होते.
सर्व कामे सारखी महत्त्वाची नसतात. सर्वप्रथम आवश्यक आणि वेळेवर पूर्ण करणे गरजेचे असलेली कामे पूर्ण करा.
एकाच वेळी अनेक कामे करण्याऐवजी एका कामावर पूर्ण लक्ष केंद्रित केल्यास काम अधिक चांगल्या दर्जाने आणि कमी वेळात पूर्ण होऊ शकते.
सतत सोशल मीडिया, मेसेज किंवा अनावश्यक नोटिफिकेशन्स तपासल्यामुळे बराच वेळ वाया जातो.
प्रत्येक कामासाठी ठराविक वेळ निश्चित करा. यामुळे अनावश्यक विलंब टाळता येतो.
प्रत्येक विनंती स्वीकारणे आवश्यक नसते. आपल्या प्राधान्यक्रमानुसार निर्णय घेतल्यास वेळेचा अधिक चांगला उपयोग होतो.