sandeep Shirguppe
लहानमुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना भात खायला आवडतो. भात शरीराला ऊर्जा प्रदान करतो.
आपण तांदूळ शिजवताना त्यांचे पाणी फेकून देतो. पण या तांदळाच्या पाण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात.
कच्चा तांदूळ ३० मिनिटे पाण्यात उकळवल्याने त्यातील जास्त स्टार्च पाण्यात सोडतो. ज्याचा आरोग्याला अधिक फायदा होतो.
तांदळाचे पाणी त्वचेसाठी टोनर, क्लिन्झर, त्वचा उजळवण्यासाठी, हायपरपिग्मेंटेशन, सन टॅन म्हणून काम करेल.
तांदळाच्या पाण्यात अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, ए, फिनोलिक आणि फ्लेव्होनॉइड संयुगे आढळतात जे त्वचेसाठी फायदेशीर आहेत.
शाम्पूने अंघोळ केल्यानंतर तांदळाच्या पाण्याने टाळूला मसाज करा. ज्यामुळे जीवनसत्त्व आणि खनिजे केसांच्या मुळापर्यंत पोहोचतात.
तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या जाणवत असेल किंवा खाण्याची इच्छा होत नसेल तेव्हा तांदळाचे पाणी फायदेशीर ठरते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.