sandeep Shirguppe
आयुर्वेदिक दृष्टिकोनातून कडुलिंबात अनेक औषधी गुणधर्म असतात जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात.
आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाचे सेवन केल्यास शरीरातील अर्धे आजार बरे होतात.
सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाणे. रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.
कडुलिंब रक्तातील टॉक्सिन बाहेर काढून रक्त डिटॉक्सिफाय करते. रक्त शुद्धीकरणास याचे फायदे होतात.
कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने ऍसिडिटी आणि पोटदुखीपासून आराम मिळतो.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास सर्दी, खोकला यांसारखे आजार बरे करण्यासाठी कडुलिंबाची पाने उपयुक्त आहेत.
कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून त्यातून काढलेला रस साधारणपणे सेवन केला जातो.
कडुनिंबाची पानं तव्यावर कोरडी भाजून, हाताने मॅश करून, लसूण आणि मोहरीचं तेल घालून भातासोबत खाऊ शकता.