Mahesh Gaikwad
अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प नुकताच लोकसभेत मांडला.
अंतरिम अर्थसंकल्पात कोणत्याही मोठ्या घोषणा न केल्यामुळे सर्वच क्षेत्रांची निराशा झाली आहे.
आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सितारामण यांनी शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
देशातील ११.८ कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळाल्याचे सितारामण यांनी सांगितले.
याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारने शेतीमालाच्या किमान आधारभूत किमतींमध्ये वाढ केल्याचेही सांगितले.
पीकविमा योजनेंतर्गत देशातील ४ कोटी शेतकऱ्यांनी पिकांचा विमा केला. ई-नाम अंतर्गत १३६१ बाजार समित्यांचे एकिकरण केले.
देशातील एक कोटी महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ झाल्याचेही त्यांनी सांगितले.