Team Agrowon
मोकळ्या जमिनीमध्ये पावसाचे आणि ओलिताचे पाणी सहज मुरते.
मशागतीमुळे हवा खेळती राहिल्यामुळे वनस्पतीची मुळे आणि सूक्ष्मजीवांची चयापचय क्रिया योग्य रितीने होण्यास मदत होते. मातीमध्ये असलेल्या सेंद्रिय पदार्थांचे विघटन जलद गतीने होण्यास मदत होते.
जमिनीत हवा आणि पाणी यांच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवता येते. जमिनीचा जास्तीत जास्त भाग सूर्याच्या उन्हाखाली आणल्यामुळे तापमान वाढून जमिनीतील सूक्ष्मजीवांच्या कार्यालाही वेग मिळतो. या प्रक्रिया जलद झाल्याने पिकाला फायदा मिळतो.
धसकटे काढणे
मशागतीमुळे पूर्वीच्या पिकाचे धसकटे काढली जाऊन नव्या पिकांच्या मुळांच्या वाढीला जागा उपलब्ध होते. जमीन पेरणी व पुढील सिंचनासाठी तयार करणे सोपे जाते.
पिकांपेक्षा वेगाने वाढून तणे पिकांशी अन्न, पाणी व अन्य घटकांसाठी स्पर्धा करतात. त्याचा विपरीत पिकाच्या उत्पादनावर पडतो. बहुवार्षिक तणांच्या गाठी व मुळ्या काढण्यासाठी तीन वर्षांतून एकदा खोलवर नांगरणी आणि वेचणीची शिफारस केली जाते.
किडींचे प्रादुर्भाव व समस्या जरी पिकावर दिसत असल्या तरी किडीच्या जीवनप्रक्रियेतील काही अवस्था मातीमध्ये पार पडत असतात.
सेंद्रिय/भरखते जमिनीत मिसळणे
सेंद्रिय खते जमिनीवर पसरवल्यास त्यातील सेंद्रिय कर्बासह अन्नद्रव्यांचा ऱ्हास वेगाने होते. त्यामुळे अशी खत मशागतीनंतर मातीमध्ये चांगल्या प्रकारे मिसळून थोड्या खोलीवर दिल्यास पिकांना अधिक फायदा होतो.
Buffalo Sellection : अशी करा दुधाळ म्हशीची निवड