Team Agrowon
राज्यात चारा टंचाईचं संकट अधिक तीव्र होऊ लागलं आहे.
परभणी, अहमदनगर जिल्ह्यांच्या पाठोपाठ सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी आंतरजिल्हा चारा वाहतुकीला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
याबद्दलची माहिती जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिली. ते म्हणाले, "सध्या जिल्ह्यात टंचाई नाही. पण संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन आंतरजिल्हा चारा टंचाई वाहतूक बंद करण्यात आली आहे."
सांगली जिल्ह्यातील जत आणि आटपाडी तालुक्यात पाणी टंचाई जाणवू लागली आहे.
या भागातील ७१ जिल्ह्यांना ६७ टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय. दरम्यान संभाव्य चारा टंचाईचं नियोजन करत सांगली जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात चारा घेऊन जाण्यावर बंदी करण्यात आली आहे.
यापूर्वी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात परभणी आणि अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आंतरजिल्हा चारा वाहतुकीवर बंदी घातली आहे.