Swarali Pawar
ही अळी केवळ सोयाबीनच नाही तर झेंडू, भेंडी, कोबीसारख्या पिकांनाही हानी पोहोचवते.
अंडी, अळी, कोष, पतंग अशा चार अवस्था असतात. एक मादी २५०-३०० अंडी देते. अळ्या रात्रभर पानांवर ताव मारतात.
अळ्यांसहित जाळीदार पाने गोळा करून रॉकेलमिश्रीत पाण्यात टाकावीत. एरंडी झाडांचा वापर सापळा पीक म्हणून करावा.
प्रत्येक हेक्टरसाठी ५ कामगंध सापळे लावावेत. पतंग अडवण्यासाठी हा प्रभावी उपाय आहे.
एस. एल. एन. पी. व्ही. हे विषाणूजन्य कीडनाशक १० मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास अळ्यांच्या शरीरात विषाणू पसरून त्यांचा नाश होतो.
बिव्हेरिया बॅसियाना व नोमुरिया रिलेई या बुरशी अळ्यांमध्ये रोग निर्माण करून त्यांचा नाश करतात.
डायफलोव्हास ७६% EC किंवा एन्डोक्झार्काब १५.८% EC हे कीटकनाशक ६.६ मि.ली. १० लिटर पाण्यातून फवारावे.
सुरुवातीपासून पिकांचे निरीक्षण, योग्य जैविक, यांत्रिक व रासायनिक पद्धतींचा समन्वय म्हणजे यशस्वी अळी नियंत्रण.