Mahesh Gaikwad
दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे. अशा दिवसांत जनावरांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
वाढत्या तापमानामुळे जनावरांमध्ये उष्माघात होण्याचा धोका असतो. वेळीच उपचार न केल्यास जनावरे उष्माघाताला बळी पडतात.
उन्हाळ्यामध्ये वातावरणातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होते. वातावरणातील उष्णता जनावरांच्या शरीराद्वारे शोषल्यामुळे त्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान १०३ ते ११० फॅरेनहाईटपर्यंत वाढते.
उष्माघात झालेल्या जनावरांमध्ये जनावर एका जागी उभा राहणे, बेचैन होणे, खाली बसणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात. यालाच उष्माघात म्हणतात.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दुपारच्यावेळी भर उन्हात जनावरे चरायला नेणे टाळावे. उन्हाच्या झळांपासून जनवारांचा बचाव करावा.
भर उन्हात जनावरांना जड कामांना जुपू नये. या काळात जनावरांना विश्रांती द्यावी. गोठ्याच्या पत्र्याला आतील बाजूस पांढरा रंग द्यावा. यामुळे गोठ्यातील तापमान कमी राहिल.
उपाशी जनावरांकडून अवजड कामे करून घेणे टाळावे. पुरेसा चारा आणि पिण्याच्या पाण्याची सोय करावी. जनावरांच्या शरीरावर दिवसांतून २-३ वेळा थंड पाणी फवारावे.