sandeep Shirguppe
उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी फ्रिजमधील पाणी पिणे योग्य आहे का?. याचे नेमके दुष्परिणाम काय भोगावे लागतात.
आयुर्वेदात गार पाणी आरोग्यासाठी नुकसानदायक असल्याचं म्हंटलं आहे. खास करून फ्रिजमधील थंडगार पाणी कायम टाळावं.
उन्हातून घरी परतल्यावर किंवा जेवणानंतर गार पाणी प्यायल्याने शरीरावर त्याचा वाईट परिणाम होवू शकतो.
एका संशोधनानुसार थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात त्यामुळेही पचनाची समस्या निर्माण होते.
थंड पाणी प्यायल्याने घसा खवखवणे, कफ, सर्दी आणि घशाला सूज येणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
फ्रिजमधील थंड पाणी जास्त प्यायल्याने क्रॅनियल नर्व्ह स्टिम्युलेट म्हणजेच उत्तेजित होते. त्याचा परिणाम हार्ट रेटवर होतो.
उन्हातून आल्यानंतर जर लगेचच खूप थंड किंवा बर्फाचं पाणी प्यायल्याने मेंदू फ्रिज होण्याची शक्यता असते.
फ्रिजमधील पाण्याने शरीरातील चरबी अधिकच कडक होवू लागते त्यामुळे ही चरबी वितळण्यास अडचणी होतात.
बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी थंड पाणी पिणं टाळावं. अन्यथा हा त्रास आणखी वाढण्याची शक्यता असते.