Deepak Bhandigare
उन्हाळ्यात शरीराला नेहमीपेक्षा अधिक पाण्याची गरज भासते, त्यासाठी एका व्यक्तीने दररोज सुमारे २.५ ते ३ लिटर पाणी प्यायला हवे. पण, शारीरिक हालचाल, वय आणि हवामानानुसार पाणी पिण्याच्या प्रमाणात बदल होऊ शकतो
जर तुम्ही मेहनतीचे अथवा जास्त शारीरिक श्रमाचे काम करत असाल, तर रोज ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे
जर तुमचा दिनक्रम हलका असेल, तर अडीच ते तीन लिटर पाणी शरीरासाठी पुरेसे समजले जाते, पण, जर तुम्ही नियमित व्यायाम अथवा अधिक शारिरिक हालचाल करत असाल, तर याहून अधिक पिणे अधिक योग्य ठरते
जर शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास, थकवा, डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो, त्यासाठी रोज पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे
पाणी कमी प्रमाणात प्यायल्याने बद्धकोष्ठता, अॅसिडिटी आणि अपचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात
शरीरात पाण्याची कमतरता झाल्यामुळे त्वचेचे नैसर्गिक तेज कमी होतो आणि ती निस्तेज दिसू लागते, तसेच कोरडेपणा वाढतो
उन्हाळ्यात उष्माघात, चक्कर येणे आणि कमी रक्तदाब यांसारख्या समस्या होण्याची शक्यता अधिक असते
दर दोन तासांनी पाणी प्यायला हवे, उन्हाळ्यात नारळ पाणी, लिंबू सरबत आणि कलिंगड, काकडी आणि संत्री यांसारखी फळे खावीत