Swarali Pawar
गारपीट आणि वादळी पावसामुळे उसाला मोठा धोका निर्माण होतो. अशा वेळी तात्काळ योग्य उपाय करणं खूप महत्त्वाचं आहे.
पानं फाटतात, कांड्यांना जखमा होतात. यामुळे वाढ कमी होते आणि उतारा घटतो.
जखमांमधून बुरशी आणि जीवाणू सहज प्रवेश करतात. यामुळे लाल कुज, स्मटसारखे रोग वाढतात.
शेतात साचलेलं पाणी तात्काळ बाहेर काढा. योग्य निचरा केल्याने मुळांना ऑक्सिजन मिळतो.
जखमा भरून येण्यासाठी बुरशीनाशकाची फवारणी करा. ट्रायकोडर्मा किंवा कॉपरयुक्त औषध उपयोगी ठरते.
२% युरिया किंवा १% 19:19:19 खताची फवारणी करा. यामुळे पिकाला ताकद मिळून वाढ सुधारते.
प्रति एकर १ लिटर ह्यूमिक अॅसिड पाण्यातून द्या. यामुळे मुळांची वाढ सुधारते आणि अन्नद्रव्य शोषण वाढते.
रासायनिक खत सेंद्रिय खतांसोबत द्या. यामुळे पिकाची वाढ आणि उत्पादन दोन्ही सुधारते.