Swarali Pawar
सध्या गारपीट आणि वादळी पावसाची शक्यता वाढली आहे. अशा वेळी जनावरांची सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची असते.
दररोज हवामानाचा अंदाज तपासत राहा. इशारा मिळताच जनावरांना त्वरित सुरक्षित ठिकाणी आणा.
वादळी वाऱ्यात झाडे पडण्याचा धोका असतो. म्हणून जनावरांना झाडाखाली बांधणे टाळा.
शेडची पत्रे उडू शकतात, त्यामुळे मजबूत गोठा आवश्यक आहे. जनावरांना सुरक्षित आणि भक्कम निवाऱ्यात ठेवा.
गोठ्यात पाणी येऊ नये म्हणून ताडपत्री लावा. गोठा ओला राहिल्यास जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
जनावरांना दिवसातून तीन वेळा पाणी पाजावे. दुपारी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत चरायला सोडू नका.
गोठा स्वच्छ व कोरडा ठेवा, चुन्याचा वापर करा. गोचीड, मच्छर टाळण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करा.
लाळ्या खुरकूत व आंत्रविषार यांसारख्या लसी वेळेवर द्या. दुधाळ जनावरांची कास स्वच्छ ठेवा आणि संसर्ग टाळा.