Mahesh Gaikwad
यंदा राज्यातील अनेक भागात दुष्काळाची स्थिती पाहायला मिळत आहे. या दुष्काळाचा फटका ऊस पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर बसण्याची शक्यता आहे.
पाणी टंचाईचा थेट परिणाम उसाच्या नव्या लागवडीवर होण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे पुढील हंगामात उसाच्या उपलब्धता २५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने सुरूवातीपासूनच उसाच्या लागवडी या संथ गतीने सुरू राहिल्या आहेत.
यावर्षीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला तरीही ऊस लागवड मात्र धिम्या गतीने सुरू असल्याचे दिसत आहे.
पाण्याअभावी लागवडीत घट झाल्यास पुढील वर्षीच्या हंगामात उसाची कारखान्यांना उसाची कमतरता भासण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर पुढील वर्षात ऊस लागवडी कशा राहतील या संदर्भातील माहिती केंद्र सरकारकडून संकलित करण्यात येत आहे.
राज्यात जूनपासून पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिल्याने धरणातही मोजकाच पाणीसाठा राहिला आहे. भीतीपोटी अनेक शेतकरी लागवडी पुढे ढकलण्याच्या बेतात आहेत.