Anuradha Vipat
साखर जास्त खाल्ल्याने शरीरावर अनेक गंभीर आणि नकारात्मक परिणाम होतात.
अतिरिक्त साखरेचे रूपांतर शरीरात चरबीमध्ये होते ज्यामुळे वजन वेगाने वाढते.
जास्त साखर खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. ज्यामुळे 'टाइप २' मधुमेहाचा धोका निर्माण होतो.
साखरेच्या अतिसेवनामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि शरीरातील जळजळ वाढते.
जास्त साखर यकृतावर ताण निर्माण करते ज्यामुळे 'फॅटी लिव्हर' सारखे आजार होऊ शकतात.
साखरेमुळे दातांमध्ये जंतू वाढतात, ज्यामुळे दात किडणे, पोकळी निर्माण होणे आणि हिरड्यांचे आजार होतात.
अति साखरेमुळे त्वचेवर अकाली सुरकुत्या पडणे आणि मुरुमांचा त्रास वाढू शकतो.