Team Agrowon
होळीचा सण तोंडावर आला असून बाजारात साखरमाळेची (गाठी) मागणी वाढली आहे.
साखरेसह इतर कच्चा माल आणि कामगारांच्या वेतनात वाढ झालेली आहे. परिणामी, गाठींचे भावही २० टक्क्यांनी वाढले आहेत.
नागपुरातील गाठी विदर्भासह मध्यप्रदेशातील बाजारात विक्रीसाठी जातात. गेल्या काही वर्षांमध्ये गाठीविक्रीचा व्यवसाय ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाला आहे.
नागपुरातील इतवारी, हंसापुरी खदान, हुडकेश्वर, शांतिनगर येथून येणारे उत्पादन मजुरांअभावी कमी झाले आहे. त्याचा व्यवसायावर परिणाम होत आहे.
यंदा ५० ग्रॅमपासून पाच किलोपर्यंतची गाठ उपलब्ध आहे. फॅन्सी गाठींची विक्री नगाप्रमाणे होते. त्याचा दर आठशे रुपयांपासून आहे.
‘साखरेसह इंधन, साखर पावडर, दोरा, दूध या कच्च्या मालाच्या भावात वाढ झाली आहे. मजुरीचा प्रश्न गंभीर आहे. वाढीव दर देऊनही मजूर मिळत नाहीत, यामुळे हा उद्योग अडचणीत आहे.
होळीचा सण जवळ आल्याने गाठी उद्योगाला नव्या जोमाने सुरवात झाली आहे. गाठींचा किरकोळ विक्रीचा भाव १२० ते १४० रुपये किलो आहे. तर ठोक ७० ते ८० रुपये किलो आहे.