Anuradha Vipat
वजन कमी करण्यासाठी अनेक जण खूप कष्ट करतात, पण काहीवेळा सर्व प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही.
वजन कमी करताना निरोगी पद्धतीने ध्येय गाठण्यासाठी काही प्रमुख चुका टाळल्या पाहिजेत.
अनेक जण वजन लवकर कमी करण्यासाठी अचानक जेवणे सोडतात किंवा अगदी कमी खातात. यामुळे मेटाबॉलिज्म सुस्त होते आणि डाएटिंग सोडताच वजन दुप्पट वेगाने वाढते.
कमी झोप आणि सततचा ताण यामुळे पोटाची चरबी वाढते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज ७ ते ८ तासांची शांत झोप आवश्यक आहे.
वजन कमी करण्याच्या प्रवासात फक्त २०% वाटा व्यायामाचा असतो. तुम्ही कितीही व्यायाम केला, तरी कॅलरीजचे नियंत्रण न केल्यास वजन कमी होणार नाही.
जेवणावर नियंत्रण ठेवताना अनेक जण पॅकबंद फळांचे रस, चहा-कॉफी, कोल्ड्रिंक्स किंवा एनर्जी ड्रिंक्स यांमधून किती कॅलरीज शरीरात जात आहेत याकडे लक्ष देत नाहीत.
दिवसातून तीन-चार वेळा वजन मोजल्याने केवळ मानसिक ताण वाढतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण, स्नायूंचे वजन यांमुळे वजनात सतत बदल होत असतो.