Anuradha Vipat
रस्त्यावरील अन्न खाताना योग्य काळजी घेतल्यास चवीचा आनंदही घेता येतो आणि आरोग्याचे धोकेही टाळता येतात.
विक्रेता अन्न बनवताना आणि वाढताना ग्लोव्हज वापरत आहे का ते पहा. तसेच भांडी धुण्यासाठी स्वच्छ पाणी वापरले जात आहे की नाही याकडे लक्ष द्या.
गाड्याभोवती कचरा साठलेला नसावा. कचराकुंडी उघडी असल्यास तिथे माश्या बसतात आणि त्या अन्नावर बसून रोगराई पसरते.
पाणीपुरीचे पाणी किंवा ज्यूसमध्ये वापरला जाणारा बर्फ स्वच्छ पाण्याचा आहे का, याची खात्री करा.
जे पदार्थ आधीच बनवून उघडे ठेवलेले आहेत ते खाणे टाळा.
जे अन्न तुमच्यासमोर कढईतून गरम-गरम काढले जात आहे, तेच खाण्याला प्राधान्य द्या.
रस्त्यावरील चायनीज गाड्यांवर वापरले जाणारे रंग आणि सॉस अनेकदा निकृष्ट दर्जाचे असतात.