Aslam Abdul Shanedivan
औषधी वनस्पतींचा उपयोग औषधे बनवण्यासह अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये केला जातो. यामुळे शेतकरी याकडे वळत आहेत.
शेतकरी या वनस्पतींच्या लागवडीतून अधिकाधिक आणि चांगला नफाही मिळवत आहेत.
भारतामध्ये सर्वाधिक औषधी वनस्पतींचे उत्पादन हे राजस्थानमध्ये घेतले जाते. येथे ३७.०१ टक्के औषधी वनस्पती उत्पादन होते.
दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू
तुळशी, अश्वगंधा, कोरफड, लेमन ग्रास, गिलॉय आणि पुदीना यांसारख्या अनेक औषधी वनस्पतींची लागवड तामिळनाडूत केली जाते. यामुळे ते दुसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतातील पहिल्या तीन राज्यांमध्ये मध्य प्रदेशचा क्रमांक लागत असून येथे १९.७८ टक्के औषधी वनस्पतींचे उत्पादन होते.
तर दरवर्षी ७.२२ टक्के औषधी वनस्पतींचे उत्पादन घेऊन या यादीत छत्तीसगड चौथ्या क्रमांकावर आहे
तर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ३.५९ टक्के औषधी वनस्पतींचे उत्पादन घेत बिहार पाचव्या क्रमांकावर येतो.