Aslam Abdul Shanedivan
मोड आलेल्या कडधान्याला ‘सुपरफूड’ म्हटले जाते. यात असणाऱ्या उपयुक्त घटकांमुळे शरीराला भरपूर फायदा मिळतो.
शरीर सुदृढ आणि आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर आपल्या आहारात नियमित मोड आलेली कडधान्ये असायला हवीत
मोड आलेली कडधान्य ही उन्हाळ्यात पचनास चांगले असते. यात मटकी, मूग आणि चवळी हे पचनास हलके असते. तर उडीद, हरभरा, आणि पावटा हे जड असतात.
मोड आलेली कडधान्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व आढळतात. यात ‘क’ जीवनसत्व असतं. तर वातुळपणा कमी होतो.
मोड कडधान्यात टॅनीन आणि फायटीक अॅसीड तयार होते. यामुळे शरीराला चांगला फायदा होतो.
मोड आलेली कडधान्ये वाळवल्यास त्यात कर्बोदकांचं प्रमाण वाढते. यामुळे पाचकतेत लक्षणीय वाढ होते.
मोड आलेल्या धान्यात प्रथिनं, जीवनसत्वे, खनिजं आणि कर्बोदकं आढळतात. यामुळे आपले आरोग्य उत्तम राहतं.