Swarali Pawar
सोयाबीनमध्ये सुरुवातीला तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. वेळेत तणनियंत्रण केल्यास पिकाची वाढ आणि उत्पादन दोन्ही सुधारते.
पेरणीनंतरचे पहिले ३० दिवस पीक तणमुक्त ठेवणे गरजेचे आहे. याच काळात तण पाणी, अन्नद्रव्ये आणि जागेसाठी पिकाशी स्पर्धा करतात.
पेरणीनंतर जास्तीत जास्त ४८ तासांच्या आत फवारणी करा. यामुळे तण उगवण्यापूर्वीच त्यांचे नियंत्रण होते.
सल्फेनट्राझोन २८% + क्लोमाझोन ३०% डब्ल्यू.पी. हे संयुक्त तणनाशक वापरा. हे सोयाबीनमधील सुरुवातीच्या तणनियंत्रणासाठी प्रभावी ठरते.
प्रति लिटर पाण्यात २.५ ग्रॅम तणनाशक मिसळा. किंवा एकरी ५०० ग्रॅम तणनाशक २०० लिटर पाण्यातून फवारा.
तणांची सुरुवातीपासूनच वाढ कमी होते. पिकाला पाणी, अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश अधिक मिळतो.
वेळेवर खुरपणी करण्याची गरज कमी पडते. यामुळे मजुरीचा खर्च आणि श्रम दोन्ही वाचतात.
सुरुवातीपासून तणांचे नियंत्रण झाल्यास पीक जोमाने वाढते. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.