Anuradha Vipat
पावसाळा सुरू होताच अनेकांना सतत शिंक येणे, नाक वाहणे, घशात खवखव होणे किंवा डोळ्यांत खाज येणे यासारख्या समस्या जाणवू लागतात.
पावसाळ्यातील दमट वातावरण आणि हवामानातील बदल यांचा श्वसनसंस्थेवर परिणाम होतो.
पावसाळ्यात तापमान आणि आर्द्रतेत सतत बदल होत असतात. या बदलांमुळे नाकातील संवेदनशील भाग उत्तेजित होऊन शिंक येऊ शकते.
धूळ, बुरशी , परागकण आणि दमट वातावरणातील सूक्ष्म कणांमुळे अॅलर्जिक राइनायटिसचा त्रास वाढू शकतो.
पावसाळ्यात घरातील भिंती, कपाटे आणि ओलसर जागांवर बुरशी वाढण्याची शक्यता जास्त असते.
पावसाळ्यात सर्दी, फ्लू आणि इतर व्हायरल संसर्ग वाढू शकतात. अशा संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यात वारंवार शिंक येऊ शकते.
ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्यांना हवामानातील बदलांचा अधिक परिणाम जाणवू शकतो.