Anuradha Vipat
सर्पदंश झाल्यावर योग्य माहिती नसणे आणि भीतीमुळे चुकीचे उपाय करणे हे प्राणांतिक ठरू शकते.
सर्पदंश झाल्यास पहिले ६० मिनिटे अत्यंत महत्त्वाचे असतात. जीव वाचवण्यासाठी खालील ५ सुवर्ण नियम ताबडतोब पाळा.
दंश झालेल्या व्यक्तीला अजिबात घाबरू देऊ नका. तिला एका जागी शांत बसवा किंवा झोपवा.
दंश झालेल्या हाता-पायातील अंगठी, घड्याळ, दागिने, दोरे किंवा घट्ट कपडे ताबडतोब काढून टाका.
जखम साबण आणि स्वच्छ पाण्याने हलक्या हाताने धुवा. त्यानंतर दंश झालेल्या भागाच्या थोडे वर 'प्रेशर इमोबिलायझेशन' पद्धतीचा वापर करून सुती कापडाने हलकी पट्टी बांधा.
रुग्णाला ताबडतोब शासकीय किंवा मोठ्या रुग्णालयात घेऊन जा. रुग्णाला होणारा त्रास डॉक्टरांना स्पष्ट सांगा.
जखमेवर ब्लेडने चीरा मारू नका. तोंडने विष चोखून बाहेर काढण्याचा प्रयत्न कधीही करू नका. जखमेच्या वर दोरीने अतिशय घट्ट 'टूर्निकेट' बांधू नका.