Anuradha Vipat
झोप पूर्ण न होणे केवळ थकव्यापुरते मर्यादित नसून, त्याचे शरीरावर आणि मनावर गंभीर परिणाम होतात.
पुरेशी झोप न मिळाल्यास मन अस्वस्थ राहते, ज्यामुळे छोटी-मोठी कारणे चिडचिडीला कारणीभूत ठरतात.
कामात लक्ष न लागणे, निर्णय घेताना गोंधळ होणे आणि स्मरणशक्ती कमकुवत होणे असे त्रास होतात.
झोपेत आपले शरीर आजारांशी लढणाऱ्या पेशी तयार करते. झोप पूर्ण न झाल्यास तुम्ही वारंवार आजारी पडू शकता.
अपुऱ्या झोपेमुळे भूक वाढवणारे संप्रेरक वाढतात, ज्यामुळे आपण जास्त खातो आणि वजन वाढते.
डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे, त्वचा निस्तेज दिसणे आणि अकाली सुरकुत्या पडणे अशा समस्या जाणवतातआवश्यक
एका निरोगी प्रौढ व्यक्तीला दररोज ७ ते ९ तासांची शांत झोप आवश्यक असते.