Anuradha Vipat
दुपारचे जेवण वेळेवर न करणे किंवा पूर्णपणे टाळणे ही सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत एक सामान्य सवय झाली आहे.
दुपारचे जेवण टाळणे आरोग्याच्या दृष्टीने ही सवय अत्यंत घातक ठरू शकते.
दुपारचे जेवण टाळल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक खालावते.
पोट रिकामे राहिल्याने तीव्र ॲसिडिटी, छातीत जळजळ आणि गॅस होण्याचा त्रास सुरू होतो.
दुपारचे जेवण न केल्यामुळे दुपारनंतरच्या कामात लक्ष लागत नाही, सुस्ती येते आणि कामाची क्षमता कमी होते
दुपारी न जेवल्यामुळे शरीर रात्रीच्या वेळी जास्त भुकेचे संकेत देते. यामुळे रात्रीच्या वेळी जास्त कॅलरी असलेले अन्न खाल्ले जाते.
जर तुम्हाला कामामुळे पूर्ण जेवण करणे शक्य नसेल, तर किमान फळे, ताक किंवा सुका मेवा तरी घ्या.