sandeep Shirguppe
कडुलिंबाचे आयुर्वेदात खूप मोठे स्थान आहे. त्वचेची काळजी घेतानाही कडुलिंब सर्वात फायदेशीर मानला जातो.
कडुलिंबाचे पाणी प्यायल्याने मुरुम आणि ऍलर्जीच्या समस्येपासून आराम मिळतो.
कडुनिंबाच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटी व्हायरल, अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात.
कडुलिंबाच्या पानांमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, फायबर, अमिनो अॅसिड, नायट्रोजन, फॉस्फरस असे अनेक पोषक घटक असतात.
शरीरात विषारी पदार्थ असल्यामुळे मुरुमांची समस्या उद्भवते, तर कडुलिंबाचे पाणी प्यायल्याने शरिरातील घाण निघून जाते.
पोटाच्या उष्णतेमुळे चेहऱ्यावर पिंपल्स दिसू लागतात. कडुलिंबाचे पाणी प्यायल्याने पोटातील उष्णता शांत होते
कडुनिंबाच्या पानांमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करतात.
तज्ञ म्हणतात की फक्त कडुलिंबाचे पाणी काही लोकांना सूट करत नाही, अशा परिस्थितीत त्यांनी कडुलिंब आणि कोरफड मिसळून प्यावे.