Aslam Abdul Shanedivan
राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नावीन्यतामंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नव्या वर्षात नवी घोषणा केली आहे.
१५ ते ४५ वयोगटांतील व्यक्तींना रोजगारक्षम बनविण्यासाठी कौशल्य विकास सोसायटीमार्फत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार
यासाठी कौशल्य विकास सोसायटीमार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाची अंमलबजावणी केली जाणार
या अभियानातंर्गत महाराष्ट्रातील १०० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरू केली जाणार आहेत. येथे कॉमन कॉस्ट नॉर्म्सनुसार प्रशिक्षण शुल्क देण्यात येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतात प्रथमच ५११ कौशल्य विकास केंद्रांचे एकाच वेळी उद्घाटन करण्यात आले.
कौशल्य विकास केंद्रांमार्फत गावातील नागरिकांना रोजगार कमावण्याची, नवे कौशल्य शिकण्याची समान संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
कौशल्य विकास प्रशिक्षण हे युवकांच्या जीवनात नवी पहाट आणेल. त्या दृष्टीने कौशल्य केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.