Mahesh Gaikwad
पाणी हेच जीवन असे आपण म्हणतो. जर पाणीच नसेल तर मानवी जीवन कसे असेल, याची कल्पनाच न केलेली बरी.
त्यामुळे सर्वांनाच जल संवर्धनाचे महत्त्व माहित असायलाच पाहिजे. आज आपण असेच काही सोपे उपाय पाहणार ज्यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होवून त्याची बचत होईल.
स्वयंपाक घरात भाज्या-फळे नळाखाली न धुता एका भांड्यात पाणी घेवून धुवा. भाज्या धुतल्यानंतर तेच पाणी झाडांना घाला.
भांडी घासताना वाहत्या नळाखाली भांडी घासणे टाळा. त्याऐवजी जेवढी गरज आहे तेवढेच पाणी बादलीत घेवून भांडी घासा.
अंघोळ करताना शक्यतो शॉवरखाली अंघोळ करण्याचे टाळावे. शॉवरखाली अंघोळ करताना मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते. त्याऐवजी बादलीत पाणी घेवून अंघोळ करा.
चारचाकी, दुचाकी धुण्यासाठी थेट नळाला पाईप लावून पाणी वापरू नका. त्याऐवजी बादलीत लागेल तेवढेच पाणी घेवून तुम्ही गाड्या धुवू शकता.
वापर झाल्यानंतर नळ पूर्णपणे बंद करा. नळ बंद केल्यानंतरही त्यातून थेंब-थेंब पाणी गळत असेल, तर तात्काळ दुरूस्ती करून घ्या.