Swarali Pawar
एल निनोमुळे यंदा पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. म्हणून विहिरीचं पुनर्भरण करून पाणी साठवणं खूप गरजेचं आहे.
पावसाचं पाणी विहिरीत सोडून जमिनीत मुरवणं म्हणजे पुनर्भरण. यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होते.
ओढा, नाला किंवा वाहून जाणारं पावसाचं पाणी वापरता येतं. हे पाणी वाया न घालवता साठवणं महत्त्वाचं आहे.
पहिला खड्डा ३×३×१ मीटर आणि दुसरा २×१.५×२ मीटर घ्या. दोन्ही खड्डे योग्य अंतरावर करून पाईपने जोडा.
खड्ड्यात खडी, वाळू आणि विटांचा चुरा अशा थरांची मांडणी करा. यामुळे पाणी स्वच्छ गाळून विहिरीत जाते.
थेट गाळयुक्त पाणी विहिरीत सोडू नका. स्वच्छ पाणी गेल्याने विहीर सुरक्षित राहते.
औद्योगिक किंवा क्षारयुक्त पाणी वापरू नका. दरवर्षी गाळण यंत्रणा स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.
विहिरीचं पुनर्भरण म्हणजे पाण्याची बचत आणि सुरक्षा. यामुळे दुष्काळातही शेतीसाठी पाणी उपलब्ध राहते.