Swarali Pawar
हवाबंद न ठेवलेला किंवा जास्त ओलसर मुरघास खराब होतो. त्यामध्ये बुरशी व अपायकारक जंतू वाढतात.
मुरघासात पावसाचे पाणी साचल्यास तो खरा होतो. चारा उशिरा कापल्यास आंबवण योग्य होत नाही.
मुरघासाला दुर्गंध येतो किंवा बुरशी दिसते. असा मुरघास जनावरांसाठी अपायकारक असतो.
खराब मुरघासामुळे रवंथ प्रक्रिया मंदावते. पोटफुगी आणि अपचनाची समस्या वाढते.
जनावरांची भूक कमी होते आणि दूध उत्पादन घटते. जनावर थकलेले व अशक्त दिसू लागते.
जुलाब, दुर्गंधीयुक्त शेण आणि पोटदुखी दिसते. काही वेळा लिस्टिरिओसिससारखे आजार होऊ शकतात.
मुरघास शास्त्रीय पद्धतीने व हवाबंद तयार करावा. आहारात मुरघास हळूहळू आणि मर्यादित द्यावा.
चांगला मुरघास म्हणजे निरोगी जनावरे. मुरघासाच्या गुणवत्तेकडे नेहमी लक्ष द्या.