Anuradha Vipat
आपल्या आजूबाजूला काही लोक अत्यंत गोड बोलणारे असतात, पण प्रत्यक्षात ते मानसिक किंवा भावनिकदृष्ट्या नुकसान पोहोचवू शकतात.
वेळीच सावध न झाल्यास हे लोक तुमचे आयुष्य तणावग्रस्त बनवू शकतात.
हे लोक तुमच्या तोंडावर तुमचे कौतुक करतील, पण तुमच्या पाठीमागे इतरांकडे तुमची निंदा करतात.
स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी हे लोक सतत स्वतःला 'पिडीत' दाखवतात.
काम असेपर्यंत हे तुमच्याशी अतिशय प्रेमाने वागतील आणि काम संपताच बदलतील.
यांच्या संपर्कात आल्यावर किंवा यांच्याशी बोलल्यावर तुम्हाला मानसिक थकवा जाणवू लागतो.
यांच्याकडून कितीही मोठी चूक झाली तरी हे कधीही माफी मागत नाहीत.