Anuradha Vipat
गुढीपाडव्याला गुढीवर कडुलिंबाची पाने लावण्यामागे धार्मिक, शास्त्रीय आणि आरोग्यविषयक अशी महत्त्वाची कारणे आहेत.
कडुलिंब हा नैसर्गिक जंतुनाशक असून तो रक्ताभिसरण सुधारण्यास आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो.
गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी कडुलिंबाची पाने, जिरे, हिंग आणि गूळ यांचे मिश्रण खाण्याची प्रथा आहे.
गुढीला लावलेली कडुलिंबाची पाने 'कडू' असतात आणि साखरेची गाठी 'गोड' असते. हे मानवी जीवनातील सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींचा समतोल असतो.
कडुलिंबाच्या पानांमुळे आजूबाजूची हवा शुद्ध होते. गुढी उंच ठिकाणी लावली जाते, जेणेकरून त्यावरून येणारी हवा घरात शुद्ध होऊन येईल.
प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्येत परतले, तेव्हा विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली गेली.
कडुलिंब हा विजयाचा आणि समृद्धीचा आशीर्वाद मानला जातो.