Anuradha Vipat
चहामधील कॅफिन आणि टॅनिन्स थेट रिकाम्या पोटाच्या अस्तरावर परिणाम करतात.
सकाळी उठल्या उठल्या चहा प्यायल्याने शरीरातील ॲसिड आणि अल्कधर्मीय संतुलन बिघडते, ज्यामुळे अनेक आजारांचा धोका निर्माण होतो.
रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने हायड्रोक्लोरिक ॲसिडचा स्राव आणखी वाढतो. यामुळे छातीत आणि पोटात जळजळ होणे, आंबट ढेकर येणे आणि पित्त वाढणे असा त्रास सुरू होतो.
रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने हे टॅनिन्स शरीराला आपण दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणातून खाल्लेल्या अन्नातील लोह आणि कॅल्शियम शोषून घेण्यापासून रोखतात.
सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण आणखी कमी होते, ज्यामुळे पोट व्यवस्थित साफ होत नाही आणि बद्धकोष्टतेचा त्रास होतो.
सकाळी रिकाम्या पोटी गोड चहा प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वेगाने वाढते.
सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याने चहामधील ॲसिड तोंडातील नैसर्गिक बॅक्टेरियांसोबत प्रक्रिया करते. यामुळे दातांचे संरक्षण करणारे कवच म्हणजेच 'इनेमल' हळूहळू घासले जाते.